Posts

माझे दैवी अनुभव भाग ११

जन्मपत्रिका म्हणजे आपल्या जन्माच्या वेळची ग्रहस्थिती. यात आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा लेखाजोखा असतो. त्यामुळे याजन्मातील कर्माचा हिशोब जन्मपत्रिकेत दिसत नाही. अगदी याचमुळे या जन्मातील कर्माला विशेष महत्व प्राप्त होते. आपले भविष्य हे मागच्या जन्मातील कर्माचा आणि या जन्मातील या आधीच्या कर्माचा मेळ आहे आणि अगदी इथेच ज्योतिषाचा उत्तम उपयोग होतो. आपले पूर्वकर्म काय निर्देशित करते आणि आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याकरिता अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यावर योग्य उपाय केले तर आयुष्यात मोठा बदल सहज घडवता येतो. पण माझ्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे असा प्रश्न विचारून केवळ दैवावर अवलंबून राहिलो तर ज्योतिषाचा विशेष उपयोग होत नाही. उपाय म्हटले कि आपल्या मनात पूजा, शांती, वगैरे असल्या गोष्टी येतात पण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाणे, चांगल्या आरोग्याकरीता व्यायाम करणे, जोखीम आहे तिथे Insurance घेणे  हे सगळे उपायच आहेत. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं तेव्हा मी विविध प्रकारच्या उपायांचा अभ्यास करायचं ठरवलं. वर दिलेले उपाय आपण सगळेजण करतोच म्हणून मी थोडे Unconventional उपाय शिकायचं ठरवलं. माझे सास...

माझे दैवी अनुभव भाग १०

हैद्राबादला गेल्यावर नवीन शहर, नवीन भाषा, नवीन कामाचा ताण या सगळ्यांबरोबर Adjust होण्याबरोबरच आम्ही सुद्धा एकमेकांना Adjust होत होतो. एवढं सोपं नसतं ते, नाही का? या काळात पुण्याला अनेकदा येणं जाणं होत असे. पुणे हैद्राबाद या रस्त्यावर मधले काही Patches Sensitive आहेत. Mostly मी Bus Prefer करायचो कारण Ticket सहज मिळायचं आणि घराजवळ Pick Up / Drop  होता. असंच एकदा पुण्याहून हैद्राबादला जात असताना मला एक वरात दिसली. त्या वरातीत सगळे Skeletons होते आणि ज्यांना खांदा दिलेला ती मात्र माणसं होती. हा काय प्रकार आहे हे कळायच्या आताच माझ्या अंगावर शहारे आले. मंत्राची मला सवय असल्याने मी चट्कन मंत्र धरला आणि काही समजण्याच्या आताच बस पुढे निघून गेली. हा काय प्रकार आहे हे मला कळलं नाही. ते खरं आहे की माझी कल्पना आहे हे मी ठरवू शकलो नाही. हॆ सगळ्यांना दिसतं की नाही याबद्दल मला कुतूहल होत. मी अनेक दिवस त्याच्यावर विचार करत होतो पण पुढे बरीच वर्षं हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. आपल्याला जे समजलंच नाही ते दुसऱ्यांना सांगणार तरी कसं? त्याचे काही परिणाम नव्हते त्यामुळे काही दिवसांनी ते मी विसरून गेलो...

माझे दैवी अनुभव भाग ९

 अनुग्रहपूर्वीची अनेक वर्ष घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी लहान असूनही आणि मला एखाद्या विषयातलं काहीही कळत नसून सुद्धा अनेकजण माझा ज्योतिषी म्हणून सल्ला घेत. त्यामुळे मला जे प्रश्न पडतात ते कोणाला विचारायचे हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. दुसरं म्हणजे एवढ्या लहान वयात आपल्याला सगळं कळतं असं वाटणं ही फार चांगली गोष्ट नाही, कारण हे शिकायचं वय असतं आणि आपण स्वतःहुन शिकलेलं बरं असतं.  नियतीने जर आपल्याला शिकवायचं ठरवलं तर ते शिक्षण फारच अवघड होऊन बसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नतमस्तक व्हायला एक जागा आवश्यक असते. अनुग्रहाने ती जागा मला सापडली आणि पुढची सगळी वर्षं आनंदात गेली. २००७ साली उपासनेचा महत्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आमचं लग्न झालं. या काळात मी ज्योतिष एवढं सोडून दिलं होतं की कल्याणीला म्हणजे माझ्या बायकोला मी ज्योतिष पाहत होतो असं लग्न झाल्यावर अनेक महिन्यांनी कळलं. त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे आमची दोघांची पत्रिका जुळते का नाही हे सुद्धा मी पहिले नाही. गंमत म्हणजे मी लग्न करेन असे घरच्यांना त्यावेळी शक्य वाटत नव्हतं त्यामुळे मी लग्न करतोय याबद्दलच ते खुश होते. ...

माझे दैवी अनुभव भाग ८

आईची अनेकांशी ओळख असल्याने आमच्याकडे वेगवेगळ्या वयोगटातले अनेक जण अगदी सहज म्हणून येत. अनेकदा मला त्याचा कंटाळा येत असला तरी आई मात्र अनेकदा आलेल्या व्यक्तीशी न चुकता ओळख करून देत असे. असेच एक दिवस संध्याकाळी आमच्याकडे एक आजोबा आले होते आणि आईने माझी त्यांच्याशी नेहमीप्रमाणे ओळख करून दिली. ते गेल्यानंतर मी आईला म्हटलं की हे गृहस्थ एक मोठी आध्यात्मिक Background असलेले असावेत आणि माझा यांच्या आध्यात्मिक Background शी संबंध आहे असं मला वाटलं. तू त्यांना जरा याबद्दल विचार. आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली, तूच त्यांच्या घरी जाऊन काय विचारायचं ते विचार मी यात अजिबात पडणार नाही. मी लगेच दुसऱ्याच  दिवशी संध्याकाळी Cycle मारत त्यांचा पत्ता हुडकत त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना सगळी माहिती विचारली. ते खरंच एका संप्रदायाशी खूप जवळून  जोडलेले होते.  ते लागलीच म्हणाले, तुला एवढा संबंध वाटत असेल तर तू अनुग्रह घेच मी स्वामींशी बोलतो. ते दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी आले आणि त्यांनी मला अनुग्रहाची Date आणि Procedure सांगून टाकली. विशेष म्हणजे फार दिवस मधे नसल्याने मी ज्या व...

माझे दैवी अनुभव भाग ७

मी लहान असल्यामुळे आणि मोफत भविष्य पहात असल्याने अनेक जण भविष्य विचारायला येत असत. अगदी माझे मित्र सुद्धा गंमत म्हणून प्रश्न विचारत असत. १२ वी झाल्यानंतर मी जरी BSc ला गेलो तरी  माझे अनेक मित्र Obviously Engineering ला गेले. त्यातला एक मित्र बाहेर गावाचा होता पण त्याला चांगले गुण मिळाल्याने तो पुण्यातल्या Top College मध्ये Computer Engineering करू लागला. सधन कुटुंबातून आल्याने Hostel ची सवय नव्हती त्यामुळे तो आमच्या घरी Weekend ला अनेकदा यायचा. माझी आई माझ्या सगळ्याच मित्रांना प्रेमाने खायला घालायची तशीच त्यालाही घालायची. High IQ असणाऱ्यांच्या एका संस्थेचा तो सदस्य होता. त्यामुळे ज्योतिष वगैरे सब झूठ है आणि आम्ही लोक उगीचच वेळ फुकट घालवत आहोत असं त्याचं पक्कं मत होतं. एक दिवस तो मला म्हणाला की ज्योतिष जर खरं असेल तर आज मी दिवसभरात काय केलं असेल ते सांग बरं. (असले प्रश्न लोक अनेकदा विचारतात.) मी पट्कन मनात प्रश्न कुंडली मंडळी आणि म्हटलं की आज उशिरा जेवलास वाटतं आणि कडधान्याची उसळ खाल्लीस. बिचाऱ्याची हवा Tight झाली. गंमत म्हणजे भाजी आवडत नाही म्हणून त्या दिवशी Mess मधे केवळ पोळी आणि ...

माझे दैवी अनुभव भाग ६

इकडे माझे Graduation सुरु असताना माझ्या मित्राचं सुद्धा Graduation सुरु होतं. जशी माझ्या आईला माझ्या पोटापाण्याची काळजी वाटायची तशीच त्याच्या घरच्यांना सुद्धा त्याच्या पोटापाण्याची काळजी वाटायची. त्यामुळे त्याचा ज्योतिषाचा अभ्यास त्यांना फारसा पसंत नव्हता. मग त्याला घरच्यांनी काही काम सांगितले की आम्ही एकत्र जायचो आणि त्यावेळी ज्योतिषावर चर्चा करायचो. असेच एकदा जुन्या स्कूटरवरून जात असताना हुतात्मा चौकात पोलिसांनी आम्हाला पकडले. (हुतात्मा चौक म्हणजे दगडूशेठ गणपती आणि लाल महाल यांच्या मधला चौक.)   काय तर म्हणे Scooter ची Number Plate नीट दिसत नाही. त्या पोलिसाने बाजूला उभा असलेल्या ३ star officer कडे म्हणजे साहेबाकडे नेले. बाकी सगळे कागद आहेत पण Number Plate नीट दिसत नाही तेव्हा पावती फाडावी लागेल असे साहेबांनी आम्हाला सुनावले. आधीच कडकी असताना फुकटचे दंड कोण भरणार? अब कुछ तो करना पडेगा! असा विचार मनात घोळत असतानाच साहेबांच्या बोटातील मणिकाची अंगठी माझ्या नजरेने हेरली आणि मी तत्क्षणी उचल खाल्ली. डोक्यात पंचांग असायचंच. पटकन मनात प्रश्न कुंडली मांडली आणि साहेबांना म्हटलं की तुम्हाला ...

माझे दैवी अनुभव भाग ५

दहावीच्या परीक्षेनंतर मी माझ्या वडिलांना (आम्ही त्यांना भाऊ म्हणतो) सांगितलं की मला काही शिक्षणात फार अर्थ वाटत नाही त्यामुळे Result कितीही चांगला लागला तरी मला काही पुढे शिकण्यात रस नाही. भाऊ म्हणाले की ठीक आहे! पण आज काल सगळे कमीत कमी Graduate तरी होतात तेव्हा तू तेवढं तरी शिक. नंतर तुला उगीच वाटायला नको की आपण मागे राहिलो. तुला काही ते अवघड नाही. मी पण त्यांना म्हणालो बरोबर आहे. बाकी गोष्टी करता करता मी Graduation नक्कीच करू शकेन. असा आमचा पुढचा Plan ठरला. पुढे ११वीत Science ला Admission घेतली आणि Engineering ला Free Seat न मिळाल्यामुळे आरक्षणाचा निषेध म्हणून मी BSc ला Admission घेतली. मला माहीत होतं की ही ३ वर्षे माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाकरिता पर्वणी आहे. पण आईला माझ्या पोटापाण्याची काळजी वाटत असल्याने तिने पोटापाण्याकरीता Graduation नंतर काय करता येईल याचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यात Computer Course केला तर काही काळजी नाही असं तिला समजल्यानंतर तिने पुढची चौकशी करून Graduation बरोबरच २ वर्षाच्या Computer कोर्सची Admission पक्की केली. पण एवढी Fee कशी भरायची असा विचार सुरु असतान...