Posts

आमचे स्वामी ५

अनुग्रहानंतरचं एक-दीड वर्ष सगळं छान सुरु होतं. सगळी ध्यानकेंद्रे अगदी office जवळच होती. आठवड्यातून २ वेळा तरी स्वामीजीबरोबर ध्यान व्हायचं. त्यावेळी ध्यान करताना माझी मान डोलायची. याबद्दल मी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले की योगाची background आहे, त्यामुळे असं होतं. हळूहळू कमी होईल. त्यानुसार हळू हळू कमी होऊन पुढे मान डोलणं पूर्ण बंद झालं. ध्यानामध्ये वेगवेगळे रंग दिसणे, कानातून गार हवा येणे, ध्यानामध्ये बिन्दू दिसणे असे अनुभव मला येत होते. एकदा स्वामीजीनी warn केलं. अगदी सहज म्हणाले की डोळ्यावर कोणताही प्रकाश पडत असेल तर येणारे अनुभव प्रकाशामुळे असू शकतात, ते योगाचे असतातच असं नाही. मग मी एकदा काळोख करून घरी ध्यानाला बसलो आणि खात्री करुन घेतली. खरं तर मला या अनुभवांमध्ये काहीच interest नव्हता. योगाच्या अनुभवांबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि आपल्याला याच्याशी काहीही देणं घेणं नाही हे माझ्या मनात पक्कं होतं. सूर्योपासनेवर मात्र स्वामींजींचा भर असायचा. ते रोज सकाळी संध्या करायचे. अगदी परगावी सुद्धा ते संध्येसाठी स्वत:च पळी-भांडं घेऊन जायचे. ध्यानासाठी कोणती योगासनं करायची असा प्रश्न एकदा ...

आमचे स्वामी ४

 एका रविवारी सकाळी सकाळीच एक Phone आला. आई म्हणाली की phone वर कोणीतरी गौरीश आहे का असं विचारतंय . त्यावेळी मला सहसा कोणाचे Phone येत नसत त्यामुळे आईला आणि मला दोघांनाही आश्चर्य वाटलं. आश्चर्याच्या भरातच मी phone घेतला. पलीकडून एक ताई बोलत होत्या. त्या म्हणाल्या तुला आज वेळ आहे का असं स्वामीजींनी विचारायला सांगितलंय. मी म्हटलं कशासाठी वेळ आहे का असं विचारताय? त्या म्हणाल्या आम्ही सगळे देहूला चाललोय, संध्याकाळी परत येऊ. रविवार होता, तसंही फार काही करण्यासारखं नव्हतं, मी म्हटलं हो, चालेल, मी येईन. कुठे यायचंय? त्या म्हणाल्या आम्ही तुमच्या २ गल्ल्या पलीकडेच राहतो. Sharp १० वाजता तू तिथे ये. आपण इकडूनच जाऊ. मी त्यांना बरं म्हटलं खरं पण माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. या आहेत कोण? हे सगळे देहूला कशाला जात असावेत? आपल्याला कशाला बोलावलं असेल? आपण जाणार कसे आहोत? असं बरंच काही. मी अगदी वेळेत त्यांच्याकडे पोचलो. तसा थोडा awkward च होतो. कोणाशी ओळख वगैरे करून घ्यायची मला अजिबातच सवय नव्हती. Mostly त्यांचे पती एक मोठे सनदी अधिकारी होते आणि त्यांच्या Jeep मधून आम्ही जाणार होतो. (हो त्यावेळी म...

आमचे स्वामी ३

अनुग्रह घेतल्यानंतर आईला माझी जास्तच काळजी वाटू लागली. आता हा पुढे काय करेल? असा प्रश्न तिला बहुधा सतावू लागला असावा. आणि त्यामुळे ती नोकरीसाठी माझ्या मागे लागली. NIIT ची placement cell मला अजिबात दाद देत नव्हती आणि पुढे मलाही काही मार्ग दिसत नव्हता. एवढ्यात अनुग्रहानंतर अगदी दोन चारच दिवसांनी newspaper मधे एक जाहिरात वाचली. त्यांना Programming Languages शिकवण्यासाठी Faculties हवे होते. माझे विषय पक्के होते, शिकण्यात आणि शिकवण्यात मला interest होता म्हणून मी interview ला जायचं ठरवलं. Interview दिला आणि लगेच Select सुद्धा झालो. त्यांनी मला 2500 रुपये पगाराची offer दिली आणि गरजू मुलांप्रमाणे मी ती गपचूप स्वीकारली. त्यात आणखी एक गडबड केली. घरी कोणाशीही न बोलता २ वर्षांचा Bond sign केला. आपलं potential आपल्यालाच माहीत नसतं मग ते इतर कसे काय value करतील? आईला पगार सांगितल्यावर आई फार खुश नव्हती. ती म्हणाली की अडीच हजारात काय संसार होतो का? मी पटकन म्हटलं की इथे संसार करायचाय कोणाला? माझं भागलं तरी खूप झालं. या माझ्या वाक्याने मात्र ती जाम upset झाली. 6 जानेवारी 1999 या दिवशी finally माझी ही...

आमचे स्वामी २

आमचे स्वामी २ त्या दिवशी त्या आजोबांनी मला आणखी एक मुद्दा सांगितला. ते म्हणाले की माधवनाथ स्वामी शुद्ध परमार्थ सांगायचे. मी त्यांना विचारलं की शुद्ध परमार्थ म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले की म्हणजे उपास तापास वगैरे असलं काही करायचं नाही . थोडक्यात कोणत्याही सकाम उपासना करायच्या नाहीत. फक्त ध्यान करायचं! मी म्हटलं ठीक आहे. काही हरकत नाही. मी घरी गेलो आणि रुद्राक्षाची माळ काढून टाकली. आईला सांगितलं की आतापासून मी उपास बंद करतोय. आईला बरं वाटलं कारण तेवढंच तिचं काम सोपं झालं. पण माझ्या पुढच्या वाक्याने मात्र ती भडकली. मी तिला म्हटलं की मी आजपासून ज्योतिष पण बंद करतोय अगदी घरच्यांचं सुद्धा पाहणार नाही. तिला वाटत असावं की याला चार पैसे कमवायचा तेवढा एकच मार्ग होता तो सुद्धा बंद केला तर हा खाणार काय? ती म्हणाली तू रोज काहीतरी नवीन शोधून काढतोस. काहीतरी एक नीट धर. आणि बरंच काय काय बोलली. मुलांच्या चरितार्थाची जेवढी काळजी आईला असते, तेवढी मला वाटतं त्यांना स्वतःला सुद्धा नसते. तरीही मी स्वत:च ठरवून टाकलं की यापुढे ज्योतिष बंद म्हणजे बंद. खरं तर वयाच्या १४ व्या वर्षापासून सुरू असलेला आणि मा...

आमचे स्वामी १

साधारण सहावीत किंवा सातवीत असताना माझ्या जीवनात अशा काही गोष्टी झाल्या की त्या घटनांनी मला विचार करायला भाग पाडलं. याचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीची काहीच चूक नसताना त्याला अशा काही गोष्टी का face कराव्या लागतात आणि काय केल्याने असं होणार नाही. तशी या प्रश्नांची उत्तरं सोपी नव्हती त्यामुळे हे प्रश्न पुढे बरीच वर्ष तसेच राहिले. पण आठवीत असताना news paper मध्ये एका ज्योतिष विद्यालयाची जाहिरात वाचली. त्यांच्या office मधे जाऊन त्यांना भेटून आलो आणि घरी येऊन सगळी माहिती सांगितली. माझे आजोबाच ज्योतिषी असल्याने ज्योतिष शिकायला कोणाचाच विरोध झाला नाही. ज्योतिष शिकल्याने आपल्याला भविष्य कळेल आणि आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा घडणार नाहीत ही या मागची idea होती. एक वर्षाचा course पूर्ण झाल्यावर आजोबांच्या मदतीने मी भविष्य तर सांगू लागलो पण माझा मोर्चा उपायांकडे वळला. काय उपाय केल्याने काय होतं यामध्ये मला interest होता. त्यानुसार मी गळ्यात 54 रुद्राक्षांची माळ घातली त्यात 3 चतुर्मुखी रुद्राक्ष होते. त्यानंतर गुरुवार, शनिवार आणि संकष्टी हे 3 उपास सुरु केले. कांदा लसूण खाण...

आमचे स्वामी

 आमचे स्वामी "माझे दैवी अनुभव" या लेखमालेमध्ये मी स्वामीजींचा म्हणजे स्वामी माधवानंदांचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर काही जणांनी हे स्वामीजी कोण आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी लिहा असं suggest केलं होतं. खरं तर त्यावेळी त्यांच्या स्मरणग्रंथाचं काम सुरू होतं आणि मी सगळ्यांना त्यांच्या स्मरणग्रंथाचं काम सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यांची ओळख होईल असं सांगितलं. त्यानंतर पुढे स्वामीजींच्या स्मरणग्रंथाच्या तिसऱ्या भागामध्ये लिहिण्याबद्दल मलाही विचारलं होतं. तेव्हा पहिला विचार हाच होता की एवढंस लिहून माझं भागणार नाही! नंतर थोडा विचार केल्यावर exactly काय लिहायचं हे लक्षात आलं नाही आणि मग मी तो विचार सोडून दिला. या मे महिन्यात रत्नागिरीला जाणं झालं तेव्हा पावसहून रत्नागिरीला परत येताना विचार आला की स्वामीजींच्या personality ला अनेक dimensions होती त्याबद्दल थोडंसं तरी लिहिलं पाहिजे. स्वामीजीना भेटून बराच काळ लोटल्यामुळे एवढे दिवस मनामध्ये विचारांची मांडामांड करण्यात गेले आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही लेखमाला का सुरू करू नये असा विचार आला. त्यानुसार एक announcement म्हण...

नवीन ग्रंथ: गोचर ग्रहांच्या गुजगोष्टी (अचूक कलनिर्णयाची सोपी पद्धत)

Image
मे २०२२ मध्ये Untold Planetary Transits हा ग्रंथ मी लिहिला. यामध्ये मी तयार केलेली व अनुभवलेली गोचर ग्रहांच्या योगातून निर्माण झालेली कालनिर्णयाची एक नवीन पद्धत मांडली. त्यावेळी मी दशा पद्धती आणि गोचर पद्धती एकत्र वापरत होतो. पण त्याबरोबरच दशा पद्धतीतील काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. कालांतराने ती कोडी सुटली आणि दशा पद्धती आणखिनच अचूक झाली. पण त्याबरोबरच दशा पद्धतीच्या काही मर्यादा प्रकर्षाने लक्षात आल्या. आणि मी वापरत असलेल्या गोचर पद्धतीचे फायदेही लक्षात येऊ लागले. या सगळ्यामध्ये मी गोचर पद्धती आणखिनच सूक्ष्म पातळीवर नेऊ शकलो. या पद्धतीमध्ये आणखी काही बदल केले आणि दोन्ही पद्धती एकत्र कालनिर्णय करण्यासाठी वापरू लागलो. अनुभवाने ही पद्धत एवढी सूक्ष्म झाली की मी अनेक घटनांच्या तारखांपर्यंत जाऊन पोहोचलो. माझे वडील गेल्या वर्षी आजारी होते , तेव्हा पुढील ६ महिन्यामध्ये त्यांना रुग्णालयात केव्हा दाखल करावे लागेल याच्या तारखा घरच्यांना आधीच सांगून ठेवल्या आणि त्या सगळ्या तारखा तंतोतंत जुळल्या. या अनुभवानंतर ही पद्धत नव्याने वाचकांसमोर मांडावी हा विचार तीव्र झाला.     ...