Posts

आमचे स्वामी ३

अनुग्रह घेतल्यानंतर आईला माझी जास्तच काळजी वाटू लागली. आता हा पुढे काय करेल? असा प्रश्न तिला बहुधा सतावू लागला असावा. आणि त्यामुळे ती नोकरीसाठी माझ्या मागे लागली. NIIT ची placement cell मला अजिबात दाद देत नव्हती आणि पुढे मलाही काही मार्ग दिसत नव्हता. एवढ्यात अनुग्रहानंतर अगदी दोन चारच दिवसांनी newspaper मधे एक जाहिरात वाचली. त्यांना Programming Languages शिकवण्यासाठी Faculties हवे होते. माझे विषय पक्के होते, शिकण्यात आणि शिकवण्यात मला interest होता म्हणून मी interview ला जायचं ठरवलं. Interview दिला आणि लगेच Select सुद्धा झालो. त्यांनी मला 2500 रुपये पगाराची offer दिली आणि गरजू मुलांप्रमाणे मी ती गपचूप स्वीकारली. त्यात आणखी एक गडबड केली. घरी कोणाशीही न बोलता २ वर्षांचा Bond sign केला. आपलं potential आपल्यालाच माहीत नसतं मग ते इतर कसे काय value करतील? आईला पगार सांगितल्यावर आई फार खुश नव्हती. ती म्हणाली की अडीच हजारात काय संसार होतो का? मी पटकन म्हटलं की इथे संसार करायचाय कोणाला? माझं भागलं तरी खूप झालं. या माझ्या वाक्याने मात्र ती जाम upset झाली. 6 जानेवारी 1999 या दिवशी finally माझी ही...

आमचे स्वामी २

आमचे स्वामी २ त्या दिवशी त्या आजोबांनी मला आणखी एक मुद्दा सांगितला. ते म्हणाले की माधवनाथ स्वामी शुद्ध परमार्थ सांगायचे. मी त्यांना विचारलं की शुद्ध परमार्थ म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले की म्हणजे उपास तापास वगैरे असलं काही करायचं नाही . थोडक्यात कोणत्याही सकाम उपासना करायच्या नाहीत. फक्त ध्यान करायचं! मी म्हटलं ठीक आहे. काही हरकत नाही. मी घरी गेलो आणि रुद्राक्षाची माळ काढून टाकली. आईला सांगितलं की आतापासून मी उपास बंद करतोय. आईला बरं वाटलं कारण तेवढंच तिचं काम सोपं झालं. पण माझ्या पुढच्या वाक्याने मात्र ती भडकली. मी तिला म्हटलं की मी आजपासून ज्योतिष पण बंद करतोय अगदी घरच्यांचं सुद्धा पाहणार नाही. तिला वाटत असावं की याला चार पैसे कमवायचा तेवढा एकच मार्ग होता तो सुद्धा बंद केला तर हा खाणार काय? ती म्हणाली तू रोज काहीतरी नवीन शोधून काढतोस. काहीतरी एक नीट धर. आणि बरंच काय काय बोलली. मुलांच्या चरितार्थाची जेवढी काळजी आईला असते, तेवढी मला वाटतं त्यांना स्वतःला सुद्धा नसते. तरीही मी स्वत:च ठरवून टाकलं की यापुढे ज्योतिष बंद म्हणजे बंद. खरं तर वयाच्या १४ व्या वर्षापासून सुरू असलेला आणि मा...

आमचे स्वामी १

साधारण सहावीत किंवा सातवीत असताना माझ्या जीवनात अशा काही गोष्टी झाल्या की त्या घटनांनी मला विचार करायला भाग पाडलं. याचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीची काहीच चूक नसताना त्याला अशा काही गोष्टी का face कराव्या लागतात आणि काय केल्याने असं होणार नाही. तशी या प्रश्नांची उत्तरं सोपी नव्हती त्यामुळे हे प्रश्न पुढे बरीच वर्ष तसेच राहिले. पण आठवीत असताना news paper मध्ये एका ज्योतिष विद्यालयाची जाहिरात वाचली. त्यांच्या office मधे जाऊन त्यांना भेटून आलो आणि घरी येऊन सगळी माहिती सांगितली. माझे आजोबाच ज्योतिषी असल्याने ज्योतिष शिकायला कोणाचाच विरोध झाला नाही. ज्योतिष शिकल्याने आपल्याला भविष्य कळेल आणि आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा घडणार नाहीत ही या मागची idea होती. एक वर्षाचा course पूर्ण झाल्यावर आजोबांच्या मदतीने मी भविष्य तर सांगू लागलो पण माझा मोर्चा उपायांकडे वळला. काय उपाय केल्याने काय होतं यामध्ये मला interest होता. त्यानुसार मी गळ्यात 54 रुद्राक्षांची माळ घातली त्यात 3 चतुर्मुखी रुद्राक्ष होते. त्यानंतर गुरुवार, शनिवार आणि संकष्टी हे 3 उपास सुरु केले. कांदा लसूण खाण...

आमचे स्वामी

 आमचे स्वामी "माझे दैवी अनुभव" या लेखमालेमध्ये मी स्वामीजींचा म्हणजे स्वामी माधवानंदांचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर काही जणांनी हे स्वामीजी कोण आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी लिहा असं suggest केलं होतं. खरं तर त्यावेळी त्यांच्या स्मरणग्रंथाचं काम सुरू होतं आणि मी सगळ्यांना त्यांच्या स्मरणग्रंथाचं काम सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यांची ओळख होईल असं सांगितलं. त्यानंतर पुढे स्वामीजींच्या स्मरणग्रंथाच्या तिसऱ्या भागामध्ये लिहिण्याबद्दल मलाही विचारलं होतं. तेव्हा पहिला विचार हाच होता की एवढंस लिहून माझं भागणार नाही! नंतर थोडा विचार केल्यावर exactly काय लिहायचं हे लक्षात आलं नाही आणि मग मी तो विचार सोडून दिला. या मे महिन्यात रत्नागिरीला जाणं झालं तेव्हा पावसहून रत्नागिरीला परत येताना विचार आला की स्वामीजींच्या personality ला अनेक dimensions होती त्याबद्दल थोडंसं तरी लिहिलं पाहिजे. स्वामीजीना भेटून बराच काळ लोटल्यामुळे एवढे दिवस मनामध्ये विचारांची मांडामांड करण्यात गेले आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही लेखमाला का सुरू करू नये असा विचार आला. त्यानुसार एक announcement म्हण...

नवीन ग्रंथ: गोचर ग्रहांच्या गुजगोष्टी (अचूक कलनिर्णयाची सोपी पद्धत)

Image
मे २०२२ मध्ये Untold Planetary Transits हा ग्रंथ मी लिहिला. यामध्ये मी तयार केलेली व अनुभवलेली गोचर ग्रहांच्या योगातून निर्माण झालेली कालनिर्णयाची एक नवीन पद्धत मांडली. त्यावेळी मी दशा पद्धती आणि गोचर पद्धती एकत्र वापरत होतो. पण त्याबरोबरच दशा पद्धतीतील काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. कालांतराने ती कोडी सुटली आणि दशा पद्धती आणखिनच अचूक झाली. पण त्याबरोबरच दशा पद्धतीच्या काही मर्यादा प्रकर्षाने लक्षात आल्या. आणि मी वापरत असलेल्या गोचर पद्धतीचे फायदेही लक्षात येऊ लागले. या सगळ्यामध्ये मी गोचर पद्धती आणखिनच सूक्ष्म पातळीवर नेऊ शकलो. या पद्धतीमध्ये आणखी काही बदल केले आणि दोन्ही पद्धती एकत्र कालनिर्णय करण्यासाठी वापरू लागलो. अनुभवाने ही पद्धत एवढी सूक्ष्म झाली की मी अनेक घटनांच्या तारखांपर्यंत जाऊन पोहोचलो. माझे वडील गेल्या वर्षी आजारी होते , तेव्हा पुढील ६ महिन्यामध्ये त्यांना रुग्णालयात केव्हा दाखल करावे लागेल याच्या तारखा घरच्यांना आधीच सांगून ठेवल्या आणि त्या सगळ्या तारखा तंतोतंत जुळल्या. या अनुभवानंतर ही पद्धत नव्याने वाचकांसमोर मांडावी हा विचार तीव्र झाला.     ...

ॐ कार प्रधान

दर वर्षी स्वस्ति कोणत्या तरी workshop मध्ये जाऊन शाडूच्या मातीचा गणपती करायची पण त्याने ती एवढी खुश नसायची कारण तिला मदत घ्यायला फार आवडत नाही. Sculpture हे तिचं आवडतं skill आहे त्यामुळे तिला स्वतःला कोणाचीही मदत न घेता गणपती करायचा होता. त्यांच्या शाळेत गेल्यावर्षी पासून sculpture शिकवू लागले. ती सुद्धा बारीक सारीक काही काही करत गेली. या वर्षी म्हणाली की दादाला (म्हणजे सरांना) सांगून मी शाळेतून गणपती करुन आणते. मागचा अनुभव पाहता मी म्हटलं की पण शाडूची माती ठिसूळ असते. गणपती घरी पोहोचेपर्यंत राहील ना? आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मूर्ती सुकेल तरी का? स्वस्ति म्हणाली ओलीच मूर्ती घरी आणते म्हणजे काही झालं तर पुन्हा जोडणं सोपं पडेल. Finishing पण घरी आल्यावरच करते. शाळेतून गणपती आला न आला तरी पण दुकानातून आणण्याऐवजी यावर्षी घरातल्या गणपतीचीच पूजा करायची असं आम्ही ठरवलं. तसं सगळं अवघड होतं कारण Van मधे 8-10 तरी मुलं असतात. शाळा घरापासून पंधरा एक किलोमीटर लांब आहे. मुलं van मध्ये मजा मस्ती करतात. त्यामुळे गणपतीचं हे आगमन फार सोपं वाटत नव्हतं. आणि van काही तिला अगदी घरापर्यंत सोडत नाही. आम्...

सनातन धर्माची Lifestyle

Image
  परवा सकाळी unknown number वरून एक phone आला. मी सहसा unknown calls घेत नाही. त्यानुसार घेतला नाही. पण त्या व्यक्तीने पुन्हा 2 3 वेळा phone केला. शेवटी काय प्रकार आहे ते पहावं म्हणून phone घेतला तर ती व्यक्ती almost रडायला आली होती. पहिल्यांदा त्यांना थोडंसं समजावल्यावर परिस्थितीची gravity लक्षात घेऊन त्यांच्याशी पुढे बोलायचं ठरवलं. तो phone एका भाजी विक्रेत्याचा होता. पुण्याजवळच्या एका गावामध्ये त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. वडिलांचा लहानपणीच वियोग झाल्याने त्यांचं बालपण मामाकडेच गेलं होतं आणि पुढे मामाच्याच मुलीशी त्यांचा विवाह झाला. नंतर 2 मुलगे झाले. पत्नी अतिशय तापट असल्याने त्यांना बराच त्रास होत होता. पूर्वी पत्नी यांच्या मुलांना आणि प्रसंगी त्यांना सुद्धा मारत असे असं त्यांनी सांगितलं. आता मुलं मोठी झाल्याने कधी कधी केवळ तेच पत्नीचा मार खातात असं सुद्धा त्यांनी सांगितलं. या सगळ्याला कंटाळून मागे ते 2 महीने गाणगापूरला जाऊन राहिले होते. त्यानंतर खोलात चौकशी केल्यावर समजलं की व्यक्ती केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक सुद्धा आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक धारणा योग्य आहेत. ...