Posts

आमचे स्वामी ७

 मला वाटतं साधारण २००१ मधे स्वामीजी भांडारकर रोड वरच्या त्यांच्या घरातून तेजोनिधीला कर्वेनगरला रहायला गेले आणि त्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा काही कामासाठी घरी बोलावलं. काही एक वस्तू कोणाकडेतरी पोहोचवायची होती. मला नक्की आठवत नाही. स्वामीजीनी काम सांगितलं आणि मी उभ्या उभ्याच म्हटलं की हो हो ठीक आहे मी करतो. स्वामीजी म्हणाले आधी इथे बैस, मी सांगतो आहे तो पत्ता नीट समजून घे आणि मग तिकडे जा. पत्ता ऐकता ऐकता माझ्या लक्षात आलं की आपण कुठे तरी दुसरीकडेच जाणार होतो. कसंतरी केलेलं काम स्वामींजींना अजिबात पसंत नसायचं. काम ठराविक वेळात आणि Precision नेच त्यांना व्हायला हवं असायचं. "Excellence is the mark of spirituality." हे गुरुदेव रानडे यांचं quotation ते अनेकदा प्रवचनांमधे ते quote करायचे. बोलताना ते सहज म्हणायचे की "आपलं काम Prefect च असलं पाहिजे." पुढे एकदा आम्ही स्वामींना receive करायला मुंबईला गेलो. स्वामीजी त्यांचा अमेरिका दौरा पूर्ण करून परतत होते. आम्ही 2 cars घेऊन गेलो होतो. Flight on time आलं. स्वामीजींना घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीचा एक-दीड वाज...

आमचे स्वामी ६

 मला वाटतं २००१ साली स्वरूपयोगचं मोठं शिबिर पावसला झालं. Mostly ते पहिलं मोठं शिबीर होतं. या शिबिराला महाराष्ट्रातील विविध भागातून अनेकजण आले होते. शिबिरार्थींची संख्या साधारण ४५० ते ५०० असावी. अडीच ते तीन दिवसांचा सुंदर कार्यक्रम होता. माझही हे पहीलचं शिबिर होतं. पावसाचे स्वामी स्वरूपानंद, त्यांचे एक उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवनाथांचे एक उत्तराधिकारी म्हणजे आमचे स्वामी, स्वामी माधवानंद. थोडक्यात आम्ही आमच्या पणजोळी गेल्यासारखं होतं. स्वामींनी पहिल्याच session मध्ये सांगितलं की आपण मोठ्या स्वामींच्या इथे आलेलो आहोत, त्यामुळे मला इथे नमस्कार करायचा नाही. त्यामुळे स्वामीजींना भेटण्याचा योग येण्याची शक्यता फार कमी होती. तीन दिवसांच्या शिबिरामध्ये सकाळी सूर्योपासना, योगासनं आणि त्यानंतर ध्यान असायचं. Breakfast नंतर प्रश्नोत्तरांचं session किंवा स्वामींचं प्रबोधन असायाचं. Lunch नंतर Group discussions आणि त्याची presentations असायची. संध्याकाळच्या वेळी स्वामीजींचं प्रवचन असायचं. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिंडी असायची. मधे मधे अभंग गायन, धून सांगणं वगैरे असे कार्यक्...

आमचे स्वामी ५

अनुग्रहानंतरचं एक-दीड वर्ष सगळं छान सुरु होतं. सगळी ध्यानकेंद्रे अगदी office जवळच होती. आठवड्यातून २ वेळा तरी स्वामीजीबरोबर ध्यान व्हायचं. त्यावेळी ध्यान करताना माझी मान डोलायची. याबद्दल मी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले की योगाची background आहे, त्यामुळे असं होतं. हळूहळू कमी होईल. त्यानुसार हळू हळू कमी होऊन पुढे मान डोलणं पूर्ण बंद झालं. ध्यानामध्ये वेगवेगळे रंग दिसणे, कानातून गार हवा येणे, ध्यानामध्ये बिन्दू दिसणे असे अनुभव मला येत होते. एकदा स्वामीजीनी warn केलं. अगदी सहज म्हणाले की डोळ्यावर कोणताही प्रकाश पडत असेल तर येणारे अनुभव प्रकाशामुळे असू शकतात, ते योगाचे असतातच असं नाही. मग मी एकदा काळोख करून घरी ध्यानाला बसलो आणि खात्री करुन घेतली. खरं तर मला या अनुभवांमध्ये काहीच interest नव्हता. योगाच्या अनुभवांबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि आपल्याला याच्याशी काहीही देणं घेणं नाही हे माझ्या मनात पक्कं होतं. सूर्योपासनेवर मात्र स्वामींजींचा भर असायचा. ते रोज सकाळी संध्या करायचे. अगदी परगावी सुद्धा ते संध्येसाठी स्वत:च पळी-भांडं घेऊन जायचे. ध्यानासाठी कोणती योगासनं करायची असा प्रश्न एकदा ...

आमचे स्वामी ४

 एका रविवारी सकाळी सकाळीच एक Phone आला. आई म्हणाली की phone वर कोणीतरी गौरीश आहे का असं विचारतंय . त्यावेळी मला सहसा कोणाचे Phone येत नसत त्यामुळे आईला आणि मला दोघांनाही आश्चर्य वाटलं. आश्चर्याच्या भरातच मी phone घेतला. पलीकडून एक ताई बोलत होत्या. त्या म्हणाल्या तुला आज वेळ आहे का असं स्वामीजींनी विचारायला सांगितलंय. मी म्हटलं कशासाठी वेळ आहे का असं विचारताय? त्या म्हणाल्या आम्ही सगळे देहूला चाललोय, संध्याकाळी परत येऊ. रविवार होता, तसंही फार काही करण्यासारखं नव्हतं, मी म्हटलं हो, चालेल, मी येईन. कुठे यायचंय? त्या म्हणाल्या आम्ही तुमच्या २ गल्ल्या पलीकडेच राहतो. Sharp १० वाजता तू तिथे ये. आपण इकडूनच जाऊ. मी त्यांना बरं म्हटलं खरं पण माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. या आहेत कोण? हे सगळे देहूला कशाला जात असावेत? आपल्याला कशाला बोलावलं असेल? आपण जाणार कसे आहोत? असं बरंच काही. मी अगदी वेळेत त्यांच्याकडे पोचलो. तसा थोडा awkward च होतो. कोणाशी ओळख वगैरे करून घ्यायची मला अजिबातच सवय नव्हती. Mostly त्यांचे पती एक मोठे सनदी अधिकारी होते आणि त्यांच्या Jeep मधून आम्ही जाणार होतो. (हो त्यावेळी म...

आमचे स्वामी ३

अनुग्रह घेतल्यानंतर आईला माझी जास्तच काळजी वाटू लागली. आता हा पुढे काय करेल? असा प्रश्न तिला बहुधा सतावू लागला असावा. आणि त्यामुळे ती नोकरीसाठी माझ्या मागे लागली. NIIT ची placement cell मला अजिबात दाद देत नव्हती आणि पुढे मलाही काही मार्ग दिसत नव्हता. एवढ्यात अनुग्रहानंतर अगदी दोन चारच दिवसांनी newspaper मधे एक जाहिरात वाचली. त्यांना Programming Languages शिकवण्यासाठी Faculties हवे होते. माझे विषय पक्के होते, शिकण्यात आणि शिकवण्यात मला interest होता म्हणून मी interview ला जायचं ठरवलं. Interview दिला आणि लगेच Select सुद्धा झालो. त्यांनी मला 2500 रुपये पगाराची offer दिली आणि गरजू मुलांप्रमाणे मी ती गपचूप स्वीकारली. त्यात आणखी एक गडबड केली. घरी कोणाशीही न बोलता २ वर्षांचा Bond sign केला. आपलं potential आपल्यालाच माहीत नसतं मग ते इतर कसे काय value करतील? आईला पगार सांगितल्यावर आई फार खुश नव्हती. ती म्हणाली की अडीच हजारात काय संसार होतो का? मी पटकन म्हटलं की इथे संसार करायचाय कोणाला? माझं भागलं तरी खूप झालं. या माझ्या वाक्याने मात्र ती जाम upset झाली. 6 जानेवारी 1999 या दिवशी finally माझी ही...

आमचे स्वामी २

आमचे स्वामी २ त्या दिवशी त्या आजोबांनी मला आणखी एक मुद्दा सांगितला. ते म्हणाले की माधवनाथ स्वामी शुद्ध परमार्थ सांगायचे. मी त्यांना विचारलं की शुद्ध परमार्थ म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले की म्हणजे उपास तापास वगैरे असलं काही करायचं नाही . थोडक्यात कोणत्याही सकाम उपासना करायच्या नाहीत. फक्त ध्यान करायचं! मी म्हटलं ठीक आहे. काही हरकत नाही. मी घरी गेलो आणि रुद्राक्षाची माळ काढून टाकली. आईला सांगितलं की आतापासून मी उपास बंद करतोय. आईला बरं वाटलं कारण तेवढंच तिचं काम सोपं झालं. पण माझ्या पुढच्या वाक्याने मात्र ती भडकली. मी तिला म्हटलं की मी आजपासून ज्योतिष पण बंद करतोय अगदी घरच्यांचं सुद्धा पाहणार नाही. तिला वाटत असावं की याला चार पैसे कमवायचा तेवढा एकच मार्ग होता तो सुद्धा बंद केला तर हा खाणार काय? ती म्हणाली तू रोज काहीतरी नवीन शोधून काढतोस. काहीतरी एक नीट धर. आणि बरंच काय काय बोलली. मुलांच्या चरितार्थाची जेवढी काळजी आईला असते, तेवढी मला वाटतं त्यांना स्वतःला सुद्धा नसते. तरीही मी स्वत:च ठरवून टाकलं की यापुढे ज्योतिष बंद म्हणजे बंद. खरं तर वयाच्या १४ व्या वर्षापासून सुरू असलेला आणि मा...

आमचे स्वामी १

साधारण सहावीत किंवा सातवीत असताना माझ्या जीवनात अशा काही गोष्टी झाल्या की त्या घटनांनी मला विचार करायला भाग पाडलं. याचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीची काहीच चूक नसताना त्याला अशा काही गोष्टी का face कराव्या लागतात आणि काय केल्याने असं होणार नाही. तशी या प्रश्नांची उत्तरं सोपी नव्हती त्यामुळे हे प्रश्न पुढे बरीच वर्ष तसेच राहिले. पण आठवीत असताना news paper मध्ये एका ज्योतिष विद्यालयाची जाहिरात वाचली. त्यांच्या office मधे जाऊन त्यांना भेटून आलो आणि घरी येऊन सगळी माहिती सांगितली. माझे आजोबाच ज्योतिषी असल्याने ज्योतिष शिकायला कोणाचाच विरोध झाला नाही. ज्योतिष शिकल्याने आपल्याला भविष्य कळेल आणि आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा घडणार नाहीत ही या मागची idea होती. एक वर्षाचा course पूर्ण झाल्यावर आजोबांच्या मदतीने मी भविष्य तर सांगू लागलो पण माझा मोर्चा उपायांकडे वळला. काय उपाय केल्याने काय होतं यामध्ये मला interest होता. त्यानुसार मी गळ्यात 54 रुद्राक्षांची माळ घातली त्यात 3 चतुर्मुखी रुद्राक्ष होते. त्यानंतर गुरुवार, शनिवार आणि संकष्टी हे 3 उपास सुरु केले. कांदा लसूण खाण...