Posts

माझे दैवी अनुभव भाग १

   देव, देवता, भुतं, खरी आहेत का? उपासना पूजा वगैरे फळाला येतात का? बाबा, स्वामी, महाराज हे खरे असतात का? मंत्र तंत्र वगैरे यात काही अर्थ आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या अनेकांना पडतात. पूर्वी माणसे यावर सहज विश्वास ठेवत असत पण आता तशी परिस्थती राहिली नाही. जसे जसे आपण शास्त्रीय दृष्टीने विचार करू लागलो तसे तसे जे आधुनिक शास्त्र सांगत नाही किंवा सिद्ध करत नाही ते खरं असेल का ? अशी शंका अनेक जण घेऊ लागले आहेत. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपण पडताळून पाहावी या मताचा मी स्वतः सुद्धा आहे. आणि यातूनच अनेक गोष्टींचा पडताळा घेण्याचे प्रयन्त मी अगदी शाळेत असतानाच सुरु झाले आणि त्यानून मला अनेक अनुभव सुद्धा आले.  ते जसा वेळ मिळेल तसे मांडेन म्हणतोय. पाहूया कास जमतंय ते.     माझे आजोबा गोव्यातील एक प्रख्यात ज्योतिषी होते पण ते मी दुसरीत असतानाच निवर्तले. त्यानंतर एक कावळा सतत ३ दिवस येऊन माझ्या डोक्यावर टोच मारून गेला. या प्रसंगाचा अर्थ अजूनही मला अगम्यच आहे त्यामुळे मी त्याला Coincidence असंच म्हणतो. आयुष्यात होणाऱ्या घटनांच्या मागे काही कारणमीमांसा असते का हा विचार मी

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

Image
  पुनर्जन्म या विषयाबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. सनातन धर्मामधील संस्कार आणि क्रिया यावर आपली श्रद्धा असल्यास या पुस्तकामुळे ती दृढ होण्यास मदत होईल. पण जर आपल्याला त्याबद्दल शंका असेल तर हे पुस्तक आपल्याला नवीन दृष्टिकोन देऊ शकेल. पुनर्जन्म असतो का? जीव आणि आत्मा यात काय फरक आहे? मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? स्वर्ग असतो का? श्राद्ध करण्याने खरंच काही उपयोग होतो का? सनातन धर्मामधील अन्त्यसंस्कार करण्याची आवश्यकता आहे का? सद्गती मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग कोणता? एखादी व्यक्ति अत्यवस्थ असता आपण काय करू शकतो? मृत्यूनंतरचे जीवन कसे असते? पूर्वजन्मामधील कर्माचा पुढील जन्मामध्ये कसा परिणाम असतो? हा परिणाम पत्रिकेमध्ये कुठे दिसतो? सद्गती मिळण्यासाठी आपण काय करू शकतो? या जन्मामधून आपण पुढील जन्मामध्ये काय नेतो? जुळ्या मुलांचे जन्म कसे ठरतात? त्यांच्या पूर्वजन्मामधील पत्रिका कशा असतात? जन्मखुणा का असतात? जन्मदोष का निर्माण होतात? पुनर्जन्माबद्दल शास्त्र ग्रंथ काय सांगतात? कर्माचे प्रकार कोणते? या जन्मामधील इच्छांचा पुढील जन्मावर परिणाम कसा होतो? पुनर्जन्म कोणत्य

ज्ञानी पुरुषाच्या जीवाची गती

ज्योतिषावर विश्वास नसणाऱ्या आध्यात्मिक व्यक्तींकारिता गीतेमधील 3 श्लोक. नक्की वाचा. अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्। तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः।।8.24।। The northern course [of the sun] consisting of six months, is fire, light, day and bright one. Departing in it, the Brahman-knowing men attain the Brahman . धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्। तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते।।8.25।। The southern course [of the sun], consisting of six months, is smoke, night, and also dark. [Departing] in it, the Yogin attains the moon's light and he returns. शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते। एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः।।8.26।। For, these two bright and dark courses are considered to be perpetual for the world. One attains the non-return by the first of these, and one returns back by the other one. याचा भावार्थ असा आहे की दक्षिणायनामध्ये, कृष्ण पक्षात, किंवा रात्री देह ठेवणाऱ्या ज्ञानी पुरुषाला सुध्दा पुनर्जन्म घ्यावा लागतो. गीतेने

दैवम् चैवात्र पंचमं?

Image
ज्योतिषाच्या बाबतीत दैवम चैवात्र पंचमम् म्हणजे दैव हे भगवंतांनी शेवटचं सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी या कर्मावर अवलंबून असून दैवाला अतिशय नगण्य महत्त्व आहे हे सांगण्याकरता भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या काही अध्यात्मिक व्यक्ती ही ओळ वापरतात. केवळ दैवावर अवलंबून राहून स्वतःचे नुकसान करून घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न करून अपयश आल्याने दैव समजून घेण्याचा  प्रयत्न करणारे सुद्धा बरेच आहेत. या सगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याऐवजी गीता या विषयावर खरंच हे लोक म्हणतात तसं म्हणजे दैव पाचवं  आहे असं म्हणते का हे पाहूया. अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनािधपाः।  न चैव न भविष्यामः सव वयमतः परम् ॥१२॥ भगवद्गीता अध्याय २ अर्थ: मी कोणत्याही काळे नव्हतो,  तू नव्हतास,  किंवा हे राजे लोक नव्हते असे नाही. आणि यापुढेही आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. याचा अर्थ असा होतो की भगवद्गीतेला पुनर्जन्माची कल्पना मान्य असावी.  पुढे दुसऱ्याच अध्यायात  भगवान म्हणतात की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। भ

चिंगीचा बाप्पा

Image
 गणपतीच्या आदल्या दिवशी office मधून घरी येता येता पाहिलं तर आमच्या Watch women ची मुलगी मातीचा गणपती तयार करत होती. मला खाली यायला थोडा उशीर झाल्याने कल्याणीचं आणि तिचं आधीच थोडं conversation झालं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. एका gas cylinder वर एक फळी ठेऊन ती मातीचा गणपती तयार करत होती. अरे वा गणपती का? माती गाळून घेतली का? असा प्रश्न मी विचारल्यावर तिने माझ्याकडे जो कटाक्ष टाकला त्यात अनेक shades होत्या. हा स्वतः ला समजतो कोण? मी काय वेडी आहे का? मी काय पहिल्यांदाच मातीच्या वस्तू करतेय का? वगैरे वगैरे… असे बरेच अर्थ मला त्या कटाक्षात जाणवले आणि मी जरा सावध झालो. अगदी तेवढ्यातच कल्याणी म्हणाली की तिने गणपती करुन शाळेत नेला होता. आता फक्त ती सोंड आणि हात पुन्हा लावतेय. हो तर, मला माहिती आहे. अशा आवेशात चिंगीने मान हलवली आणि ती पुन्हा गणपतीचे हात जोडू लागली. एवढं सगळं झाल्यावर वर मी माझा experts advice देणं टाळलं. काळी माती कोराडी झाल्यावर त्याला तडे जातात. नंतर चिकटवलेले भाग सुटतात. म्हणून तर शाडू माती वापरतात. असलं काहीही न सांगता, मी 'छान! चालूदेत' असं म्हटलं आणि बाहेर

माझे दैवी अनुभव भाग १८

Image
अनेकदा आपल्या आयुष्यात नवे नवे अनुभव येतात आणि त्यातुनच आपण समृद्ध होतो. मला तर नेहमी असं वाटतं की नवीन कोडी सोडवण हा उत्क्रांत आणि उन्नत होण्याचा मार्ग आहे. कोणताही विषय आपल्याला पुरेसा माहिती झाला असं वाटलं की universal energy आपल्याला पुढचं Puzzle देते आणि त्यावेळी लक्षात येतं की चला ही level आपण Cross केली. तीच कोडी पुन्हा पुन्हा सोडवण्यात काही मजा नाही हो. नाही का? माझ्या बाबतीत हल्लीच एकदा असंच झालं. मी एका कामाकरिता एका Semi-Government Office मध्ये गेलेलो. माझ्या ओळखीची व्यक्ती मध्यस्थ होतीच. काम होणार याची बऱ्यापैकी खात्री होती. खरं म्हणजे मी जायची आवश्यकताच नव्हती पण ते मध्यस्थ म्हणाले की साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना विचारलं की काय झालं? तर ते म्हणाले की सहसा न भेटता काम होतं पण तुम्हाला का बोलावलंय माहीत नाही. मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलंत का तर म्हणाले, हो सगळं सांगितलंय. असं म्हटल्यावर विषय माझ्या लक्षात आला. वेळ ठरवून आम्ही दोघे भेटायला गेलो. ते मध्यस्थांना म्हणाले तुम्ही जरा बाहेर बसा. पुढे साधारण काय असणार ते माझ्या लक्षात

माझे दैवी अनुभव भाग १७

त्या दिवशी ताईवर झालेला रेकीचा Impact पाहून मी रेकी ची पुढची Level Complete करायचं ठरवलं. माझ्या मित्राच्या ओळखीचे एक सर होते आणि मी त्यांच्याबद्दल बरंच चांगलं ऐकलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेच पुढची Level करायची असं माझं आधीच ठरलं होतं. तरी ऑफिस आणि बाकी कामं यात ६ महिने गेले. शेवटी एक दिवस मी त्यांना Phone केला. ते म्हणाले मी महिन्याला एकच Course घेतो तुम्ही पुढच्या महिन्यात या. पुढचा महिना म्हणजे जून. तारीख वगैरे सगळी ठरली. गम्मत म्हणजे आम्ही जिकडे सोहळ्याला गेलो होतो तिथून अगदी जवळच हा Course होता.  तो एक रविवार होता. सकाळी प्रचंड पाऊस सुरु होता पण तरीही  माझं  जायचं पक्कं होतं. Car घेऊन मी साधारण पाच-साडेपाच वाजता पुण्याहून निघालो. जवळपास पावणे नऊ वाजता मी त्या शहरात पोहोचलो. त्या सरांना Phone केला. सर, मी इथे इथे आहे तर तिथे कसं यायचं? मी विचारलं. ते म्हणाले अरे तू अगदी तिथेच आहेस. सर म्हणाले. माझ्याकडे त्या जागेचं Google Location होतं. Google ने मला सांगितलं की  Your destination has arrived. Google दृष्टीने आलेलं हे destination मला काही दिसेना. Traffic आणि पाऊस दोघेही धो धो पडत

माझे दैवी अनुभव भाग १६

आजचा अनुभव थोडा दमानं घ्या. जिथे वाटेल तिथे थांबा. चला तर मग. आम्ही एका metro city मध्ये एका सोहळ्याला गेलो होतो. जायला यायला सोपं पडावं म्हणून Car घेऊन गेलो होतो. संध्याकाळचा सोहळा होता तो आटोपला आणि मस्त जेवण झाल्यावर पान वगैरे खाऊन आमची रात्री राहायची व्यवस्था केली तिथे गेलो. आमचे Host त्याच Building मध्ये वरच्या मजल्यावर राहत होते आणि खालच्याच मजल्यावर त्यांची आणखी काही जागा होती. त्यामध्ये एक मोठा लांब लचक हॉल आणि mostly २ extra bedrooms होत्या. आमची व्यवस्था त्यातल्याच एका Bedroom मध्ये होती. Hall मध्ये सगळेजण छान गप्पा मारत होते म्हणून मुलांना आतल्या खोलीत झोपवलं. आम्हीही थोड्यावेळाने झोपायला गेलो. त्यावेळी साधारण बारा, सव्वा बारा वाजले असतील. साधारण दीड पावणेदोनची वेळ असेल तिथे झोपलेल्या एका ताईला जोरात खोकला येऊ लागला. तिच्या आईने तिला पाणी आणून दिलं आणि मांडीवर घेतलं. फार फार तर ४-५ वर्षाची असेल ती मुलगी. तिचा खोकला काही केल्या थांबेना. तिच्या खोकल्याने आम्हाला पण जाग आली. कल्याणी मला म्हणाली कि ताईला जरा रेकी दे म्हणजे थोडी शांत झोप लागेल. मी तिला मांडीवर घेतलं आणि रेकी दिली