Posts

सनातन धर्माची Lifestyle

Image
  परवा सकाळी unknown number वरून एक phone आला. मी सहसा unknown calls घेत नाही. त्यानुसार घेतला नाही. पण त्या व्यक्तीने पुन्हा 2 3 वेळा phone केला. शेवटी काय प्रकार आहे ते पहावं म्हणून phone घेतला तर ती व्यक्ती almost रडायला आली होती. पहिल्यांदा त्यांना थोडंसं समजावल्यावर परिस्थितीची gravity लक्षात घेऊन त्यांच्याशी पुढे बोलायचं ठरवलं. तो phone एका भाजी विक्रेत्याचा होता. पुण्याजवळच्या एका गावामध्ये त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. वडिलांचा लहानपणीच वियोग झाल्याने त्यांचं बालपण मामाकडेच गेलं होतं आणि पुढे मामाच्याच मुलीशी त्यांचा विवाह झाला. नंतर 2 मुलगे झाले. पत्नी अतिशय तापट असल्याने त्यांना बराच त्रास होत होता. पूर्वी पत्नी यांच्या मुलांना आणि प्रसंगी त्यांना सुद्धा मारत असे असं त्यांनी सांगितलं. आता मुलं मोठी झाल्याने कधी कधी केवळ तेच पत्नीचा मार खातात असं सुद्धा त्यांनी सांगितलं. या सगळ्याला कंटाळून मागे ते 2 महीने गाणगापूरला जाऊन राहिले होते. त्यानंतर खोलात चौकशी केल्यावर समजलं की व्यक्ती केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक सुद्धा आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक धारणा योग्य आहेत. ...

लग्नातील विघ्ने

काही दिवसांपूर्वी मला एक call आला. ती मुलगी विदर्भातील तालुक्याच्या ठिकाणाची होती. Counselling हवंय म्हणाली. मी म्हटलं कशाबद्दल तर म्हणाली लग्नाबद्दल. Reference कोणी दिला वगैरे चौकशी झाल्यानंतर मी तिला वेळ दिली आणि त्यावेळी phone करायला सांगितला. तिचा अगदी सांगितलेल्या मिनिटाला phone आला आणि मी impress झालो. मुलीने तिची कथा सांगायला सुरुवात केली. वय अगदी 22-23 वर्षांचं असावं पण तिच्या विचारांमध्ये clarity होती. ती म्हणाली की मी आरक्षित जातीतील आहे आणि माझा boy friend open category मधला आहे. आमचं 8 वर्षांपासून affair आहे आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं पण घरचे बोलणी करायला बसले आणि सगळंच फिसकटलं. आता माझा boy friend म्हणतोय आपण लग्न करायला नको कारण तू काही आमच्या घरात fit होशील असं वाटत नाही. मला जरा त्याच्याबद्दल शंका आली म्हणून मी तिला विचारलं, एकदम असं कसं काय झालं? तर म्हणाली आम्ही त्यांच्याकडे बोलणी करायला गेलो होतो तेव्हा त्याच्या घरच्यांनी आमच्याकडच्या लोकांचा नीट मान केला नाही म्हणून मी त्याला तिथेच सगळ्यांसमोर बोलले ते त्याच्या घरच्यांना आवडलं नाही पण त्याने तिथे  ...

नवीन ग्रंथ: वैदिक ज्योतिषाची मूलतत्वे

Image
माझं पहिलं पुस्तक Untold Vedic Astrology प्रकाशित होऊन आता जवळ जवळ 9 वर्षे झाली. त्याच्या 6 आवृत्ती प्रकाशित झाल्या. खरं तर एवढी वर्षे झाली हे मला लक्षातच आलं नाही. पण आज छान वाटतंय. ज्यावेळी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा कल्याणी म्हणाली की तू हे सगळं कशाला करतोयस? कोण वाचणार आहे तुझं पुस्तक? तिचं म्हणणं बरोबर होतं. एक म्हणजे या सगळ्यात मला काहीच अनुभव नव्हता. पुस्तक लिहिणं, छापणं आणि प्रकाशित करणं हा तसा मोठा व्याप होता आणि बाकी बऱ्याच priorities होत्या. Office मध्ये मोठी जबाबदारी होती. पण आमचे स्वामी म्हणायचे की आपल्याला समजलेल्या गोष्टी document झाल्या पाहिजेत. पुढे अनेकांना फार उपयोगी पडतात. त्यामुळे आपण आपल्याला समजलेलं लिहिलं पाहिजे असं मी ठरवून टाकलं होतं. आता लिहायला वेळ कसा मिळणार हा पुढचा प्रश्न होताच. तिथे सुद्धा स्वामींचीच idea वापरली. स्वामी प्रवासाला जाताना brief case घेऊन car मध्ये काम करायचे. पहिली 10 मिनिटं विषयांतर म्हणून अभंग ऐकले की त्यांच काम सुरु व्हायचं. मधे ते कोणाशीच फार बोलायचे नाहीत. ही संधी माझ्याकडे सुद्धा होती. सकाळी साधारण 7:30 ला cab यायची आणि ती 8:45 ला o...

मधुमेहाची महामारी - ३

 #madhumehachi_mahamari मधुमेहाचा देहावर होणारा खरा परिणाम आम्हाला २०१७ पासून कळू लागला. दरवर्षी आईचे diabetologist तिला kidneys scan (mostly sonography) करायला सांगत आणि २०१७ मध्ये पहिल्यांदाच तीच्या kidneys चा आकार कमी झालेला दिसला. त्यानंतर पुढे सलग 3 वर्षे kidneys चा आकार कमी होत गेला. पुढे तिला Covid झाला आणि Covid मध्ये पहिल्यांदा याचे परिणाम दिसले. तिचे electrolytes imbalance झाले असावेत आणि त्यामुळे तिला भास होऊ लागले. त्यावेळी infection कमी होतं म्हणून ती घरीच isolation मध्ये होती आणि Covid चे काय काय side effects होतात ते स्पष्ट नव्हतं. या सगळ्यात kidneys मुळे electrolytes imbalance झाले असतील हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. कालांतराने तिचे भास कमी झाले आणि ती बरी झाली. त्यामुळे हा विषय मागे पडला. त्यानंतर तिला जेव्हा पुन्हा असे अनेक भास एका रात्री झाले, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना माहित असलेले सगळे मंत्र म्हटले पण काही फरक पडला नाही. या सगळ्यात शेवटी ती almost unconscious झाली. त्यांनी सगळी हकीगत मला phone करुन यानंतर सांगितली (ते म्हणाले तिला कसली तरी बाधा असावी). आणि ...

मधुमेहाची महामारी - २

सन २००५ च्या सुमारास आमच्या आध्यात्मिक गुरूंनी आम्हा सगळ्या युवकांची देहायष्टी लक्षात घेऊन WRG म्हणजे weight reduction group सुरु केला आणि आम्हाला एक ideal diet दिलं. त्यावेळी मी ७५ किलो होतो आणि कल्याणी ६४ किलो होती. ते diet scientific होतं त्यामुळे त्याने माझं वजन अगदी हळू हळू म्हणजे जवळ जवळ ६ महिन्यात साधारण १० किलो कमी झालं. म्हणजेच मी ७५ वरून ६५ वर आलो. कल्याणीचं वजन सुद्धा साधारण ५ किलो कमी झालं. पण माझं वजन याहून कमी होईना म्हमून मी व्यायाम सुरु केला. आमच्या office मध्ये त्यावेळी एक ex-army trainer येत होते आणि ते साधारण दीड तास non-stop व्यायाम घ्यायचे. ते व्यायाम करुन पुढे मी आणखी ४ किलो वजन कमी केलं आणि माझ्या ideal म्हणजे ६१ किलोवर आलो. त्या काळात जवळ जवळ दीड वर्षं मी गोड पदार्थांना अजिबात स्पर्श केला नव्हता. परंतु नंतर आम्ही दोघेही कधी कधी रात्री restaurant मध्ये एक starter खायचो आणि त्यामुळे आमचं दोघांचही वजन लग्नाच्या वेळी ६५ च्या आसपास होतं. पुढे आम्ही हैद्राबादला गेलो, तिथे स्वयंपाकाचे अनेक प्रयोग केले. आणि गरोदरपणानंतर कल्याणी ८४ वर पोहोचली आणि मी ७८ वर. वजन कमी कसं कर...

मधुमेहाची महामारी - १

साधारण 25 ते 30 वर्षांपूर्वी, आधी माझ्या आईला आणि मग बाबांना मधुमेह झाला. आमच्या घरात आधीच्या पिढीत कोणालाही मधुमेह नव्हता त्यामुळे मधुमेहाची ही पहिलीच पिढी. या निमित्ताने आम्ही अनेक वेगवेगळे doctors आणि वैद्य सुद्धा पाहिले. पहिली 5 वर्षं तर आईने खूप strict diet केला आणि योग सुद्धा केला. शेवटी तिला याचा कंटाळा आला आणि मग तिने औषध सुरु केलं. आजकाल ठराविक वय झालं की मध्यम वर्गीय कुटूंबात कोणाला ना कोणाला तरी diabetes असतोच कदाचित त्यामुळेच तो एवढा seriously घेतला जात नाही की काय अशी मला शंका आहे. यानिमित्ताने आम्ही काही diabetologist ना सुद्धा भेटलो. आता कोणाला dianetes होईल आणि साधारण कधी होईल हे शोधाण्याचा doctors प्रयत्न करू लागलेले आहेत. असेच आम्ही सगळे एकदा एका diabetologist कडे गेलो असता त्यांनी आम्हाला 'sugar factory' असं संबोधलं. 😀 तेव्हा मी माझी बायको आणि लहान म्हणजे 3-4 वर्षांची मुलगी असे तिघे तिथे होतो. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा diabetes आहे. हे लक्षात घेऊन, माझा आणि माझ्या बायकोच्या पोटाचा घेर मोजून आणि आमची वजनं पाहून त्यांनी आम्हांला येत्या काही वर्षात (माझ्य...

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा

परवाच मुलीला सुट्टी लागली. सुट्टीत आमच्याकडे तात्विक चर्चा फार होतात कारण तेवढाच वेळ मिळतो. सकाळी ९ला शाळेत जाऊन संध्याकाळी ९ला परत येणाऱ्या मुलांना बाकी वेळ तरी कुठे असतो? मुलीला शाळेत nutrition या विषयावर एक धडा आहे. त्याबद्दल आम्ही बोलत होतो. त्यात मुख्यत: झाडं अन्न कसं तयार करतात यावर चर्चा चालली होती. त्यात एक chemical equation आहे. Carbon Dioxide (Co2) व पाणी (H2O) यांच्या संयोगाने, सूर्याप्रकाशाच्या मदतीने Chlorofill असलेली म्हणजेच हिरवी झाडं Glucose म्हणजेच अन्न कसं तयार करतात. यावर चर्चा झडत होती. मुलीने मला या सगळ्याबद्दल सखोल माहिती दिली. जर झाडांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश लागत असेल तर प्राण्यांना अन्न पचवण्यासाठी D Vitamin ची आवश्यकता असावी. मी माझा गावठी मुद्दा मांडला. 'बाबा, सूर्यप्रकाश म्हणजे D Vitamin नव्हे.' मुलीने माझा मुद्दा सरळ खोडून काढला.  'हो, पण सूर्याप्रकाश म्हणजे अन्न नव्हे तरीही सूर्याप्रकाशाशिवाय झाडांमध्ये अन्न तयार होत नाही. हे तसंच आहे.' मी सफाई दिली. अशीच चर्चा पुढे गेली. दावे प्रतिदावे झाले आणि 'याचं काहीतरी वेगळंच असतं'...